daraara 24 Taas "news website"Hindi Marathi news "darara 24tas"darara 24 Taas "political"gavakadchya batmya "

१.४.२५

शिवसेनेची जिल्हा आढावा बैठक माजी आमदार सहसराम कोरेटी साहेब यांच्या नेतृत्वात संपन्न

शिवसेनेची जिल्हा आढावा बैठक माजी आमदार सहसराम कोरेटी साहेब यांच्या नेतृत्वात संपन्न


मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी

अहेरी: गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त शिव सेना संपर्कप्रमुख माजी आमदार माननीय सहस्राम कोरेटी साहेब यांचे गडचिरोली येथील सर्विस येथे आगमन झाले. त्यांचे आगमन होताच शिवसेना सहसंपर्कप्रमुख माननीय हेमंत जम्बेवार साहेब आणि माननीय राजेश जी बेलसरे साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच माननीय दीपक बाबा भारसाकडे, युवा सेना जिल्हाप्रमुख माननीय पौर्णिमा ताई इस्टम, जिल्हा संघटिका यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आले भव्य स्वागत करण्यात आले. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.

तदनंतर जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी आमदार व नवनियुक्त संपर्कप्रमुख सहस्रामजी कोरेटी साहेब यांनी मार्गदर्शन केले. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. गाव तिथे शाखा, शाखा तिथे शिवसैनिक असे ब्रीदवाक्य घेऊन कामाला लागा, जेणेकरून भविष्यात शिवसेनेला यशापर्यंत पोहोचता येईल असे ते म्हणाले.

या बैठकीला माननीय नारायणजी धक्काते शिवसेना आरमोरी विधानसभा संघटक, शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय राकेश जी बेलसरे, शिवसेना जिल्हा समन्वयक माननीय अतिशय आतिश मिस्त्री, अरुणजी शेडमाके वाहतूक जिल्हाप्रमुख, माननीय कपिल पाल युवा नेते, माननीय अविनाश जी वर्गंटीवार, गडचिरोली विधानसभा महिला जिल्हाप्रमुख सौ अर्चनाताई गोंधळे, व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

लेबल:

२७.३.२५

गोंडपिपरी तालुक्यातील रेती अन् पोंभुर्णा तालुक्याला ताप! जिकडे तिकडे रेतीची वारे माप चोरी? महसूल प्रशासन निद्रिस्त! चेक निखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून? अंधारी नदिच्या नैसर्गिक धारेला अडवून बिगडवला जात आहे पर्यावरणाचा समतोल

गोंडपिपरी तालुक्यातील रेती अन् पोंभुर्णा तालुक्याला ताप!


जिकडे तिकडे रेतीची वारे माप चोरी? महसूल प्रशासन निद्रिस्त!

चेक निखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून?

 अंधारी नदिच्या नैसर्गिक धारेला अडवून बिगडवला जात आहे पर्यावरणाचा समतोल


जिवनदास गेडाम (वि.प्र.)
चंद्रपूर:गोंडपिपरी तालुक्यातील रेती घाटाची रेती अंबरनाथ तालुक्यातून धुमधडाक्यात सुरू असल्यामुळे रस्त्यांची चाळण होत आहे. तसेच अनेक गावातून ही वाहतूक होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. धूळ व ध्वनी प्रदूषणाने नागरिकांचे बेहाल होत असताना व करोडोचा महसूल बुडवला जात असताना महसूल विभाग कारवाई का करत नाही हा एक प्रश्नच निर्माण झाला आहे. 

 गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा रेतीघाट शासकीय बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ ला मंजूर करण्यात आला आहे. या रेतीची उचल व वाहतूक करण्याची जबाबदारी हैद्राबाद येथील एका बांधकाम कंपनीला देण्यात आली. मात्र सदर रेतीघाटात शासकीय नियम धाब्यावर बसवून अवैध रेती उपसा व वाहतूक करण्यात येत आहे. 

रेती वाहतूक करणारे एवढ्यावरच न थांबता नदीतून मुरूम टाकून चेक लिखितवाडा ते भिमणी घाट असा चोर रस्ता तयार करून रेती तस्करी करण्याचा प्रकार नदीतून केल्या जात आहे. शासकीय यंत्रणा मात्र अश्या अवैध प्रकाराला आळा न घालता मुग गिळून गप्प बसले असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

चेक लिखितवाडा घाट शासकीय रेती बांधकामासाठी राखीव ठेवण्यात आला.चेक लिखितवाडा येथील ४.९० हेक्टर आर. जागा सर्व्हे नंबर १७८,१७९,१८० राखीव ठेवण्यात आले. ७०० मिटर लांब ७० मिटर रूंद व १ मिटर खोल असा मापदंड वापरून १७३१४ ब्रास रेती उत्खनन करायचे होते. ज्या कंपनीला याचे कंत्राट मिळाले ती कंपनी आधी नियमानुसार कामाला लागली होती. मात्र अवघ्या महिन्याभरातच शासकीय नियमाला तिलांजली देत अवैध उत्खननाचा नवा फॉर्म्युला तयार केला आहे. 

अवैध रेती वाहतूक राजरोसपणे करता यावी यासाठी संबंधीत बांधकाम कंपनीने तर चक्क नदीतून मुरूम टाकून व अंधारी नदिच्या नैसर्गिक पाणी प्रवाहाला (धारेला)अडवून पर्यावरणाचा समतोल बिगडवत, रस्ता तयार करून रेती भरलेले हायवा ट्रक भिमणी घाटाकडे काढण्यात येत आहे. निर्धारीत केलेल्या नदीपात्रा ऐवजी दुसराच नदीपात्र पोखरून टाकण्यात आलेला आहे. असा प्रकार होत असताना प्रशासनाकडून होत असलेली मौनधारणा अनेक प्रश्नांना उजागर करणारी आहे. एवढ्या मोठ्या धाडसामागे प्रशासनासमोर नेमके कोणते वजन वापरण्यात येत आहे. असा प्रश्न निर्माण होत आहे.

गोंडपिपरी व पोंभूर्णा या दोन्ही तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांना चकमा देणाऱ्या रेती कंत्राटदारावर, कंपनीवर रेतीचे अवैध उत्खनन व ओव्हरलोड वाहतूक व नदिच्या नैसगिक मार्गाला अडवून रस्ता बनवून पर्यावरणाचा समतोल बिगडवणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे.

रेती स्टॉकचा सुचक फलक लावण्यात आले नाही. 

सबंधित विभागाने जमीन किती खोल खोदायची हा मापदंड ठरवून दिलेला असतो. परंतु या ठिकाणी एक मिटरपेक्षा अधिक खोल रेतीचे उत्खनन केले जात आहे. अंधारी नदीच्या नैसर्गिक पाण्याची दिशा वळवत नदीतूनच रोड तयार करून शार्ट कट घेत भिमणी नदीपात्रातून रेती वाहतूक करण्यात येत आहे. 

नदीतून रस्ता बनवून व नदीचा प्रवाह थांबवून पर्यावरणाचा समतोल बिगडवत चेक लिखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून केल्या जात आहे. रॉयल्टी मारताना बैठे पथक रात्रभर ठेवल्यास विना रॉयल्टी चोरटी व ओव्हरलोड वाहतूक होणार नाही. वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून अटी व शर्थीचे भंग करून अवैध रेतीची तस्करी केली जात. मजुरांच्या दृष्टीने उन्हापासून वाचण्यासाठी ग्रिनमेट वापरण्यात आलेले नाही. चेक लिखितवाडा येथील रेती घाटात होत असलेल्या अवैध प्रकाराकडे खनिकर्म व बांधकाम अधिकाऱ्यांची मुकसंमती आहे. रेतीचा उपसा नदीपात्रातून १ मीटर पेक्षा अधिक होत असून. सदर घाट बंद करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरज माडुरवार यांनी केली आहे.
=======================
गोंडपिपरी तालुक्यातील रेती वाहतूक पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावांतून रात्री बे रात्री वाहतूक सुरू असल्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. वायु व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांचे आरोग्यह धोक्यात येण्याची शक्यता आहे. पर्यावरणाबरोबरच नागरिकांचे आरोग्य जपण्याचे कार्य महसूल विभागाने करावे आणि तालुकतून होणारी ही वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी पोंभुर्णा  तालुका शिवसेना उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे.

लेबल:

२५.३.२५

तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिवस उत्साहात साजरा



तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने २२ मार्च २०२५ रोजी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आशा दिवस आरोग्याच्या रणरागिणीचा गौरव व जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा . संगीता भांगरे गटविकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा समूह संघटक (आशा) शितल राजापूर वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पडगिलवार,डॉ. प्रशांत चौधरी मा. श्री एम. एस . नन्नावरे विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर आदी उपस्थित होते. यावेळी वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, पथनाट्य, रांगोळी, असे विविध कलाकृती आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांनी सादर केली. यावेळी सर्व विजयी आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक, यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

19 वर्षानंतर माजी विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न...! स्नेहबंधांचा सुंदर सोहळा, हास्य आनंद फुलवणारा || आपुलकीची ही भेट अनोखी, सर्वांना एकत्र बांधणारा |

19 वर्षानंतर माजी विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न...!


स्नेहबंधांचा सुंदर सोहळा,
हास्य आनंद फुलवणारा ||
आपुलकीची ही भेट अनोखी,
सर्वांना एकत्र बांधणारा |

         पोंभुर्णा :- जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी ता. पोंभूर्णा जि. चंद्रपूर येथे दिनांक 22 मार्च 2025 रोजी शैक्षणिक सत्र 2006 ते 2009 या वर्षात शिक्षण घेतलेले विद्यालयीन वर्गमित्र – मैत्रीणी तब्बल 19 वर्षानंतर ची अविस्मरणीय भेट म्हणून स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष,पदाधिकारी, माजी शिक्षक मान्यवर व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित सदस्यांनी एकत्र येऊन आनंद लुटला.
                 स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष मा. श्री. विनोदभाऊ अहिरकर अध्यक्ष जनसेवा ग्रामीण विकास संस्था तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री मनोज अहिरकर मुख्याध्यापक जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी, श्री विद्याधर बुर्रीवार सर, महिला व बालकल्याण विस्तार अधिकारी एटापल्ली, श्री साईनाथ चिमुरकर सर, प्राध्यापक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पेरमिली ,श्री अनिल पोटे सर, प्राध्यापक शासकीय माध्यमिक शाळा जिमलगटा, श्री रोशन थोरात सर प्राध्यापक विश्वशांती विद्यालय मारोडा, श्री विपिन वाकडे सर ग्राम विकास अधिकारी कोसंबी, सौ मुरकुटे मॅडम प्राचार्य जनसेवा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव ,श्री संजय अहिरकर सर स. शि. जनसेवा विद्यालय दिघोरी ,श्री उंदीरवाडे सर , कु. खडसंग मॅडम , कु. चव्हाण मॅडम जनसेवा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव, सौ.बुर्रीवार मॅडम, सौ. चीमुरकर मॅडम, सौ पोटे मॅडम, राकेश गुनशेट्टीवार, विलास देहारकर ,लखन गेडाम ,प्रवीण फुलझेले हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे मान्यवर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वागत गीत, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मनोगताच्या माध्यमातून सोहळ्याची रंगत वाढली. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल कौतुक व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
        यावेळी माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष यांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन तसेच जनसेवा शाळेच्या वतीने सुद्धा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे माजी शिक्षक यांचे सुद्धा शाळेच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. 
       परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञान ज्ञानाचे पवित्र कार्य करण्यासाठी आपण जनसेवा शाळेचे बीज रोपण केले आणि या बीजाचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी माजी शिक्षकांनी मेहनत घेतली आणि अध्यापनाचे पवित्र कार्य करून सहकार्य केले असे संस्थेचे अध्यक्ष माननीय विनोद भाऊ अहिरकर यांनी आपल्या भावना मनोगतात व्यक्त केले. तसेच माजी शिक्षकांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेची पहिली बॅच घडवण्यामध्ये सर्व शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली असे प्रतिपादन केले. 
           जनसेवा शाळा ही आमच्या आयुष्याला घडविणारी आणि सन्मानाने जगण्याची दिशा देणारी शाळा ही आमच्या आयुष्यात लाभली असे मत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थ्याकडून शाळेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
        स्नेहमिलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मशाखेत्री यांनी केले , प्रास्ताविक सविता अर्जुनकर आरेकर हिने केले तर आभार सपना शिंदे नरसापुरे हिने मानले. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी जगदीश मशाखेत्री , कोमल एनप्रेडीवार रक्षणवार, पंकेश पाल ,अनिता पाल वाकुडकर, संदिप झरकर, अविनाश गोहणे, अमोल अर्जुनकर, आशिष वाकडे, सुनिल मशाखेत्री, सरिला शेरकी, वृंदाताई लेनगुरे,कालेश्वर राजुरवार, राहुल पोटे, रुपाली अर्जुनकर, रिना रोहनकर, भाग्यश्री राजुरवार, ज्ञानेश्वरी रोहनकर बोबाटे, मोनिका निमसरकर उराडे, योगिता पोतराजे, अरुणा मोहुर्ले, व इतर वर्ग मित्र मैत्रीण यांनी सहकार्य केले.
            कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना उत्तम भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. या स्नेहमिलन सोहळ्यामुळे आपसातील आपुलकी व स्नेहभाव अधिक दृढ झाला. आयोजकांनी सर्व सहभागी सदस्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
✨ स्नेहमिलन सोहळा – एकत्र येऊया, आनंद साजरा करूया!
💐 आपुलकीचे नाते, आनंदाच्या गाठी!

१५.३.२५

विविध मागण्यांचे निवेदन घेऊन सामाजिक कार्यकर्ते नकुल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट 🔹चैत्र महिन्यात सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेत विविध समस्यांना घेऊन व महाकाली मंदिर परिसरातील समस्या घेउन दीले निवेदन 🔹चंद्रपूर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अमली पदार्थाची विक्री यांबदल चर्चा

विविध मागण्यांचे निवेदन घेऊन सामाजिक कार्यकर्ते नकुल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट


🔹चैत्र महिन्यात सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेत विविध समस्यांना घेऊन व महाकाली मंदिर परिसरातील समस्या घेउन दीले निवेदन

🔹चंद्रपूर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अमली पदार्थाची विक्री यांबदल चर्चा

✍️दरारा 24 तास न्युज नेटवर्क महाराष्ट्र 

✍️धर्मपाल कांबळे, (जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर:सध्या चंद्रपूर शहरांमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. व चंद्रपूर शहरांमध्ये  मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री व अवैध रित्या विकल्या जाणाऱ्या नकली दारू असेल, देशी कट्टा व जिवंत काडतुस सर्रास पने शहरांमध्ये येत आहेत.
मागील दोन दिवसात जिल्हयात दारूबंदी कायद्यान्वये ५७ गुन्हयांची नोंद चंद्रपूर पोलिसांनी केलेली आहे. 

3 एप्रिल पासून सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेला येणाऱ्या भाविकांना उत्तम रित्या सुविधा झाल्या पाहिजे व महाकाली परिसरामध्ये पोलीस विभागाने जास्तीत जास्त लक्ष द्यावे, व मराठवाड्यातून व विदर्भातून येणाऱ्या सर्व भाविकांचे दर वर्षी समान चोरीला जातात त्या सर्व विविध मागण्यांना घेऊन महाकाली मंदिर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल कांबळे यांनी माननीय जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन  चर्चा केली.

लेबल:

१४.३.२५

चंद्रपूरचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष माननीय विनोद भाऊ अहिरकर यांचे कडून सर्व देशवासीयांना होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


माननीय श्री विनोद भाऊ अहिरकर, 
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रपूर 
महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य

लेबल:

१३.३.२५

उपनगराध्यक्ष अजित भाऊ मंगळगिरीवार यांचे कडून नगरवासीय आणि देशवासीयांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा


माननीय अजित भाऊ मंगळगिरीवार, 
उपनगराध्यक्ष नगरपंचायत पोंभुर्णा 

लेबल:

१२.३.२५

जूनगावात शिवछत्रपती स्मारक उभारू 🌍जन्मदिनानिमित्त अलकाताई आत्राम यांची ग्वाही 🎁जुनगाव येथे अलकाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा 🍞सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पुढाकार। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती

🌑जूनगावात शिवछत्रपती स्मारक उभारू

🌍जन्मदिनानिमित्त अलकाताई आत्राम यांची ग्वाही 


🎁जुनगाव येथे अलकाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा 

🍞सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पुढाकार। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती 

दरारा 24 तास...
चंद्रपूर: प्रतिनिधी तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळेच आणि प्रेमामुळे मी या पदापर्यंत येऊन पोहोचले, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, या तुमच्या प्रेमाची परतफेड तुमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारू आणि तुमच्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना भाजपा नेत्या अलकाताई आत्राम यांनी केले. त्या जूनगाव येथे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या कुमारी अलका आत्राम यांचा 12 मार्च रोजी वाढदिवस. त्यांचा वाढदिवस चंद्रपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. तालुक्यातील जुनगाव येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जूनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी अलकाताईंचा वाढदिवस सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग जी पाटील पाल, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विश्वेश्वर जी भाकरे, माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गजाननराव येलपुलवार, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल दसरुजी चुधरी, उज्वल ग्राम संघाच्या पदाधिकारी प्रवर्तिका आशाताई मधुकर झाडे, इत्यादी पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. 

याप्रसंगी कुमारी अलकाताई आत्राम यांचा राहुल भाऊ पाल यांनी सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव आभारे व प्रकाश भाकरे यांनी केले.

कृपया आमच्या छोट्याशा यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सपोर्ट करा, धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र

लेबल:

११.३.२५

मुल तालुक्यातील फिस्कुटी येथे आज पाणलोट प्रवास कार्यक्रमाचे आयोजन ⭐आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा राहणार उपस्थित

मुल तालुक्यातील फिस्कुटी येथे आज पाणलोट प्रवास कार्यक्रमाचे आयोजन


आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा राहणार उपस्थित 

🌍दरारा 24 तास न्यूज नेटवर्क🌍 

✍️संतोष गोंगले, तालुका प्रतिनिधी मुल 

⭐मुल: कृषी विभाग व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत 'वॉटरशेड यात्रा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृपया या कार्यक्रमात उपस्थित राहुन आमचा आनंद व्दिगुणीत करावा, हि विनंती.

कार्यक्रमाचे उद्घाटक

मा. ना. अशोकराव उईके साहेब पालकमंत्री, चंद्रपूर

कार्यक्रमाचे अध्यक्ष

मा. श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर सदस्य, लोकसभा चंद्रपूर - आर्णी लोकसभा क्षेत्र

प्रमुख पाहुणे

मा. श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार आमदार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र श्री. विनयजी गौडा जिल्हाधिकारी, चंद्रपूर, मिस्टर. राकेश गिरडकर उपसरपंच ग्रा. फिस्कुटी,मा. श्री अजय चरडे उपविभागीय अधिकारी मुल, विवेक जॉन्सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर,मा. श्रीमती निलीमा मंडपे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर,मा. श्री गजानंद पवार उपविभागीय कृषि अधिकारी चंद्रपूर,
 मिस्टर. बी.एच. राठोड संवर्ग विकास अधिकारी मुल, श्रीमती प्रियंका रायपुरे उपविभागीय अभियंता (जलसंधारण) मुल, मिस्टर. नितीन गुरनुले सरपंच, ग्रामपंचायत. फिस्कुटी

मा. श्री शंकरराव तोटावार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

आई श्रीमती मृदुला मोरे, तहसीलदार मुल, श्री सुनील कारडवार, तालुका कृषी अधिकारी मुल

दिनांक १२ मार्च २०२५ वेळ सकाळी ९.०० वाजता स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, फिस्कुटी

विनित : तालुका कृषि अधिकारी, मुल व उपविभागीय अभियंता (जलसंधारण) मुल, जि. चंद्रपूर)

या कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

लेबल:

६.३.२५

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची..?



महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची..?
-एडवोकेट अस्मिता अशोक टिपले वर्धा
एडवोकेट, अस्मिता अशोक टिपले वर्धा 
=======================
     अलीकडे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली आहे. अनेक लाडकी बहिणींना दीड हजार रुपये महिना मिळतात..! आणि काही बहिणींना काही कारणाने त्यांचे अर्ज दाखल होऊन सुद्धा त्यांचा अर्ज बाद करण्यात आले आहे. 
दुसरी कडे निराधार महिलांना, घटस्फोटीत महिलांना, ज्येष्ठ नागरिक महिलांना, अशा अनेक महिलांना विविध योजने मार्फत शासनाकडून पैसे मिळतात. म्हणजे शासन त्याची काळजी करते असे म्हणायला हरकत नाही?

परंतु पुढे त्यांच्या मुला, मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? हा मूळ प्रश्न निर्माण झालेला आहे.
अलीकडे सरकारी जिल्हा परिषदच्या अनेक मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गांवर आहे. मग त्या ग्रामीण/शहरी भागातील असेल आणि पुढील शिक्षण महाग झालेले आहे त्याचे काय? अशा अवस्थेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? की लाडक्या बहिणीच्या मुला, मुलींना वाऱ्यावर सोडणार? हा चिंतेचा आणि चिंतनाची बाब आहे. लाडकी बहीण म्हणजे नेमकी काय? याची व्याख्या फार मोठी आहे. ती पहिल्यांदा खऱ्या अर्थाने सत्तेत असणाऱ्या नेत्यांची समजून घेतली पाहिजे, आणि त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. समाजकारण, राजकारण, धर्मकारण या लाडक्या बहीण योजनेत येता कामा नये. बहीण हा जिथे शब्द येतो त्या ठिकाणी समान वागणूक आणि न्याय मिळायला हवा. 
काही दृष्कृत्य करणाऱ्या गुंड प्रवृत्ती नराधम मुळे, मुली आणि महिलांना असुरक्षित वाटू लागले आहे. ते त्यांना का वाटू लागले आहे, यावर खोलवर जाऊन विचार होणे गरजेचे आहे. प्रशासनाचे या गुंड्यावर नियंत्रण नाही? नियंत्रण नाही म्हणजे का नाही? आणि असेल तर मग एवढे प्रकरण कसे काय होतात. शासनात असणाऱ्या बऱ्याच लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार) वर गुन्हे दाखल आहे. 

बऱ्याच नेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गडगंज बेकायदेशीर संपत्ती असल्याचे बोलले जाते, अजूनही महिलांचा अनुशेष भरला गेला नाही. त्यामुळे महिलांना खऱ्या अर्थाने समान न्याय देण्याची जबाबदारी कोणाची? 
हे न समजणारे कोडे आहे.

 मानवसमूहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांना प्रोत्साहित करणारे वर्तन करून, 
त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हिनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने प्रयत्न केले पाहिजेत.

वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. स्त्रियांची मानसिकता बदलणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. तेथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात. 
त्यांची निर्णय क्षमता वाढविणे गरजेचे आहे.

लाडकी बहिण योजना मध्ये शासनाने ज्या महिलांना खरोखरच गरज आहे त्या महिलेला योजनेचा लाभ मिळाला नाही आणि ज्या महिला सक्षम आहेत त्या महिलांना योजनेचा लाभ दिला गेला आहे. शासनाने ९ लाख महिला (बहिणी) अपात्र ठरविण्यात आल्या त्या बहिणींना प्रत्येकी साडेसात हजार प्रमाणे जी रक्कम दिले ती रक्कम सर्व सामान्य जनतेचे आहेत. यांचा विचार सर्व सामान्य माणसाला यायला पाहिजे की नाही?

केवळ आर्थिक मदत म्हणून पंधराशे रुपये दिले म्हणजे महिला सबलीकरण होते असे नाही. महिलेच्या शिक्षणाचा, आरोग्याविषयी काही योजना करणार आहेत की नाहीत? 
हा प्रश्न महिला दिनाच्या निमित्ताने शासनाला लाडक्या बहिणीला विचारणार आहे की नाही?
कोणतीही मेहनत न करता पैसा येवू लागल्यामुळे महिलांची क्रिया शक्ती वाढण्याऐवजी कमी होतांना दिसणार आहे. 

या योजनेमुळे महिला बाहेर न पडता घरी राहत असल्याने त्यांच्या गुणवत्तेचा दर ढासळतांना दिसते आहे. आजही महिलांना जेंडरवर आधारित श्रमाची विभागणी, घरगुती कामे करणाऱ्या महिलेला कामाचे समान काम समान वेतन दिले जात नाही. महिलांना पाहिजे तो आदर मिळताना दिसत नाही. महिलांच्या सामाजिक स्वास्थ्यचा प्रश्न असो किंवा अनेक प्रश्न लाडक्या बहिणीचे भावंडं कधी सोडवणार आहेत?

आज पाहता महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिला लैंगिक अत्याचार तसेच कौटुंबिक हिंसाचारात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. ज्या महिला आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात न्याय मागण्यासाठी न्यायालयात दाद मागतात, त्या महिलांना फारसं चांगलं म्हटल्या जात नाही. पिडीताची जात, धर्म व दर्जा पाहून तक्रार दाखल केली जाते. याचे अनेक उदाहरणे देता येतील त्यातील महत्वाचे उदाहरण विनेश फोगट ह्या महिलेला आपल्या अत्याचारां विषयी पोलिस तक्रार दाखल करण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. एकट्या महाराष्ट्रात सव्वीस हजार महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळते त्या महिला कुठे गेल्या? त्यांचे काय झाले याचा विचार शासनाला आहे की नाही. नुकताच आता देशातील केंद्रीय मंत्री असलेल्या खासदार रक्षा खडसे यांची मुलगी सुरक्षित नाही. तर या देशातील सर्व सामान्य महिला सुरक्षित कसे काय असणार आहे? 

हा प्रश्न आमच्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाला कधी पडणार आहे काय? भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्य यातील फरक बहुतेक राज्यकर्ते यांना विसर पडलेला दिसून येत आहे. एका बाजूला भाषणे करून "बेटी बचाव, बेटी पढाओ" असे नारा द्यायचा आणि दुसरीकडे गर्भात मुलगी असेल तर तिला गर्भातच मारून टाकले जायचे...मग प्रश्न पडतो.. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकारी गेले कुठे? जे आयएएस आयपीएस अधिकारी झालेले आहेत.... मला राज्यासाठी राज्यातील लोकांसाठी सेवा करायची आहे. म्हणून अधिकारी झालेले जेव्हा महिलांवरील अत्याचाराची वाढ होते तेव्हा हे कोणत्या बिळात जाऊन लपतात.... 

असो आज ज्या परिस्थितीतून भारत देश चालेलेला आहे त्याचे परिणाम खूपच वाईट होत चालले आहेत. भारताची अर्थव्यवस्था जिडीपी घसरत असल्याने विशेष करून भारतीय महिलांना घर चालवणे शक्य होताना दिसत नाही... कागदोपत्री योजना हजार दिसतील, परंतु त्यातील कोणत्याही योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शासनाच्या पायऱ्या चढून चढून अनेक योजनांचा लाभ महिलांना मिळत नाही...

हे सर्व आज उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या परंतु बघ्याची भूमिका घेणारे लोकांनी अजूनही बुरसटलेल्या मानसिकतेमध्ये जगत आहेत यासारखी निंदनीय बाब काय असू शकेल आणि कोणत्या आधारावर महिला सुरक्षित राहतील...
ॲड अस्मिता अशोक टिपले वर्धा मोबाईल. नंबर.8459092788

लेबल:

२२.२.२५

मूल चे पत्रकार आणि जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे, *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित होणार

*मूल चे पत्रकार आणि जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे, *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित होणार!*


पुणे, मूल, प्रतिनिधी....
*जागृत ग्राहक राजा* या सामाजिक ग्राहक संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या  समारोप समारंभात, दिनांक २३फेब्रुवारी २०२५रोजी पुणे येथे ग्राहक चळवळीतील ५ आघाडीच्या कार्यकर्त्यांना 
*ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

यात 


१.दीपक देशपांडे,ता मूल, जि.चंद्रपूर

२.शिवाजी काळे, ता.जुन्नर

 ३.सौ दुर्गाताई शुक्रे,पुणे

 ४.सौ श्रद्धा शिंदे, इस्लामपूर

तसेच 

राज्य कार्यकरिणी विशेष सन्मान -

सौ शैला शिळीमकर, पुणे 

आणि,

यावेळी निबंध लेखन उपक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांचा बक्षीस वितरण व  यथोचित  सन्मान करण्यात येईल 

सरकारी अधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालय प्रतिनिधी पुणे,सातारा व सांगली  यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

लेबल:

२१.२.२५

एस पी साहेब चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर करता का ? साले खुपच माजलेत ओ !

एस पी साहेब चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर करता का ? साले खुपच माजलेत ओ !

दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, 9561551006

सध्या सांगली जिल्ह्यात कायदा-व्यवस्थेचा प्रश्न बिकट होत चाललाय. सगळे अवैध धंदे तेजीत आहेत. खासगी सावकारी, गुटखा, मटका, वाळूचोरी, सेक्स रॅकेट, खून, मारामा-या, ड्रग्ज विक्री, गावठी दारू, बनावट दारू विक्री सगळं सगळं खुलेआम सुरू आहे. सगळं बिनबोभाट सुरू आहे. अवैध धंदे करणारे हे सगळे समाजसुधारक सध्या तेजीत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात त्यांचा यथोचित मानसन्मान होतो. त्यांना प्राधान्याने सेवा मिळते. त्यांची योग्य पध्दतीने बडदास्त ठेवली जाते. सगळं कसं सुरूळीत आहे. पण खरी अडचण आहे ती पत्रकारांची. पत्रकार साले माजलेत. काहीही गरज नसताना अवैध धंद्यांची बातमी लावतात. ड्रग्ज पकडल्याची, विक्रीची बातमी लावतात. गांजा विक्रीची बातमी लावतात. सगळं सुरळीत असताना पत्रकार या बातम्या लावून सामाजिक वातावरण कुलूषित करत आहेत. अवैध धंदे करणारे समाजसुधारक आणि पोलिस यांच्यातला सलोखा गरज नसताना बिघडवत आहेत. समाजात जर शांतता हवी असेल तर या दोघांच्यात सलोखा असायलाच हवा ना ? कुठे हाफ मर्डर झाला, कुठे मर्डर झाला, चार-दोन रेप झाले तर काय बिघडतं ? एवढ्याने काय फरक पडतो ? लगेच कायदा-व्यवस्था संपते का ? समाजसुधारकांनी त्यांच्या फायद्यासाठी समाज नासवला, दहशत निर्माण केली. गांजा विकला, दारू विकली तर काय फरक पडतो ? दारू पिऊन पिढ्या नासल्या तर फार मोठं राष्ट्राचं वाटोळं होणार आहे का ? हे सगळं नाही चाललं तर अवैध धंदे करणारे समाज सुधारक श्रीमंत कसे होणार ? त्यांची घरं कशी चालणार ? या समाजसुधारकांच्या सामाजिक कार्यास पाठींबा दिल्याने, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांना थोडेफार पैसे मिळाले तर कुणाच्या पोटात दुखायच काय काम आहे का ? त्याला 'हप्ता' म्हणायची गरज आहे का ? राजीखुषीने दिलेल्या रकमेला 'हप्ता' म्हणून 'लक्ष्मी' ला बदनाम करतात साले पत्रकार. सगळं सुरळीत चाललेलं असताना मिठाचा खडा का टाकावा या पत्रकारांनी ? एस पी साहेब खरंच पत्रकार साले माजलेत. चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर कराच. त्याशिवाय जिल्ह्यात कायदा व्यवस्था असल्यासारखे वाटणार नाही. सर्वत्र शांतता असल्यासारखे वाटणार नाही. साहेब खरंच चार दोन पत्रकारांचे कराच एन्काऊंटर. त्याशिवाय पोलिस खात्याचा धाक निर्माण होणार नाही. जिल्ह्यात पोलिस खाते सक्रीय असल्यासारखे वाटणार नाही.

एस पी साहेब हवं तर चार-दोन नव्हे दहा-बारा पत्रकारांचे एन्काऊंटर करा. ही जमात मेल्याने काही फरक पडणार नाही. यांच्यासाठी तुमच्यावर कुणी दबावपण टाकणार नाही. हे मेले म्हणून फार कुणी आकांडतांडव करणार नाही. भले पत्रकारांच्या हजार संघटना असतील पण ते अशावेळी एकत्र पण येणार नाहीत. माझी संघटना मोठी की तुझी संघटना मोठी असा वाद घालत बसतील. जे एकत्र येवून निषेध करायला येतील त्यातले काही जण तुम्हाला गपचुप येवून भेटतील आणि म्हणतील साहेब तुम्ही केलेत ते योग्यच केलेत. तसंच पाहिजे त्याला. कारण संघटनेच्या पत्रकारांसारखं व्यापक विचाराचं दुसरं कुणी नसतं. पत्रकार एन्काऊंटर करून मारले म्हणून कुणी दगड घेवून पोलिस ठाण्यावर येणारही नाही. नेते नाटकी निषेध करतील. मिडीयासमोर तुमच्यावर कारवाईची मागणी करतील पण ती तोंडदेखलीच बरं का. त्यानंतर हळूच तुम्हाला फोन करून तुमचं अभिनंदही करतील. त्यामुळे त्यांचा निषेध, त्यांचे निषेधाचे धारधार भाषण अजिबात मनावर घ्यायचे नाही. बाकी या पत्रकार नावाच्या जमातीला कुणी धनी ना गोसावी. त्यांच्या वर्तमानपत्राचे, न्युज चँनेलचे मालकपण तक्रार करायला येणार नाहीत बरं का ? त्यामुळे बिंधास ठोका. पाच-दहा ठोकले की मग नाही कुणी विरोधात बातम्या देणार. तसेही गेली दहा वर्षे या गड्यांच्या नांग्या बाहेर आल्याच नाहीत. साले उगीचच बोंबलत असतात. 'धंदे' दोन नंबरचे असले तरी समाजासाठीच चालू असतात ना. एखाद्याने ड्रग्जच्या नशेल केला बलात्कार आणि असहाय्य तरुणीच्या गळ्यावरून चाकू फिरवत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर कुठं बिघडलं ? मागे एकदा मिरजेत एकाने नशेत असं समाजकार्य केलं होतच ना. कॉलेजची मैदाने, खुल्या जागा, अंधारी बागा येथे बसून कोणी ड्रग्ज घेत असेल, कोणी त्यांना थोड्याशा मोबदल्यात ते पुरवत असेल, त्या वस्तू आणि त्याच्या वसुलीसाठी सावकारी पद्धतीने त्याच्या आई-बापाकडून वसुलीे केली जात असेल, काही हजार रुपये देऊन व्याजापोटी काही लाखाची रक्कम किंवा घर इस्टेट लिहून कुणी घेत असेल तर कुठं बिघडतय ? सांगा ना साहेब, काय फरक पडतो इतक्याने ?

         या सगळ्याच्या विरोधात बातम्या लावायची काय गरज आहे का ? इतकं सगळं सकारात्मक काम चालू असताना पत्रकारांनी का बातम्या लावायच्या ? वातावरण नकारात्मक का करायचं ? पत्रकारांनी अशा बातम्या देऊन आगाऊपणा केल्यावर एखाद-दुसरा समाजसुधारक पत्रकारांच्या कार्यालयात कोयता, रॉड, रिव्हॉल्व्हर घेवून घुसतो. त्याने कोयत्याने, रॉडने पत्रकाराला ठोकलं तर बिघडलं कुठं ? मार देऊन उपकृत केले तर त्यात मोर्चा काढण्यासारखे, पोलिसांच्या नावाने बोंबा मारण्यासारखे काय आहे ? लगेच एसपींना निवेदन दे, जिल्हाधिका-यांना निवेदन दे, काय गरज आहे का या उलाघालींची ? दोन नंबरचे धंदे करणारे समाजसुधारक जे करतात ते चुकीचं करतात का ? ते ही रात्रंदिवस समाजासाठीच राबतात ना ? मग का पत्रकारांनी त्यात आपली टांग खुपसावी ? कशाला असल्या फंदात पडावे ? तरी पत्रकारांचे नशिब अजून म्हणावे तसे फळफळलेले नाही. त्यांच्यावर अजून हे समाजसुधारक पुर्णता प्रसन्न झाले नाहीत. ते प्रसन्न झाले तर चार दोन पत्रकारांना गोळ्यासुध्दा घालू शकतात. त्यांनी चार दोन पत्रकारांना गोळ्या घालून स्वर्ग प्राप्ती करून दिली तर तेवढचं पुण्याईच काम होईल ना त्यांच्या हातून ? हल्ली दोन चाकीवरून कुणी कुणाला साध लिप्टसुध्दा देत नाहीत. मग इथं तर थेट स्वर्ग दाखवायचा आहे. ते ही फुकटात. मग इतकं पुण्याईच काम समाजसुधारकांनी केलं तर बिघडलं कुठे ? असं कुणी केलंच तर त्याची शिफारस आपल्या खात्यामार्फत राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिक मिळण्यासाठी व्हायला हवी बरं का एस पी साहेब. विणाकारण नकारात्मक बातम्या लावायच्या. बोंबा मारत बसायचं. कागदाच्या सुरळ्या करायच्या आणि याला भेट त्याला भेट असल्या दुकानदा-या करायची काय गरज आहे का ? हे समाजसुधारक जसे पोलिसांना लक्ष्मीदर्शन देतात तसे पत्रकारांनीही गपचुप करून घ्यावे ना. तेवढच घरात बायको खुष होईल. पोरा-ठोरांच्या अंगावर चांगली कपडे येतील. आता काही हूशार, प्रामाणिक पत्रकार मित्र लक्ष्मीदर्शन करून घेतात बरं का, पण ते थोडकेच असतात. त्यांच्यासारखे सगळेच हूशार नसतात ना. पण पत्रकारांनी करावं ना लक्ष्मीदर्शन. बायकापोरं सुखी होतील, घरात जरा भरभराट येईल. पोरा-ठोरांना चांगलं शिकवता येईल, चांगल्या शाळेत घालता येईल. बायकोच्या अंगावर तोळा तोळा सोनं घालता येईल. कशाला हवेत फुकटचे भिकेचे धंदे. हे गावभर बोंबलत फिरतात. हे असं झालं, ते तसं झालं. घरात भाकरीला पिठ का नसेना, शाळेत पोरांची फी दिलेली नसते वेळेवर, पोराच्या गांडीवर कधी चड्डी व्यवस्थित नसते. गड्यांची स्वत:ची आतली चड्डी तर कधी सरळ असते का ? नेहमी दोन्हीकडं दोन भोकं आणि हे जातात समाज नीट करायला. सगळ्या गावाचं उसणपासण घेवून घर चालवतात, घरी बायको रोज यांच्या नावाने खडं फोडते, बोटं मोडते. घरी गेले की दात-ओठ खाते. तिच तोंड बंद करता येत नाही आणि हे शहाणे जातात कायदा व्यवस्थेच्या गप्पा मारायला. एसी पी साहेब पत्रकार हे सगळं जरा अतीच करतायत असं वाटत नाही का तुम्हाला ? काढा ना या एकदा सगळ्यांना ठोकून. जिथं जिथं पत्रकार असतील ना तिथे तिथे या साल्यांची नागडी धिंड काढा. गावातून काढा, नागडं करा साल्यांना आणि गावभर हिंडवा. त्यांची धिंड काढताना सगळे दारूवाले, गुत्तेवाले, गुटखावाले, मटकावाले, रेपवाले, मर्डर, रॉबरी वाले समाजसुधारक सजवलेल्या गाडीत बसवायला हवेत. तरच पत्रकारांना खरी अद्दल घडेल. साहेब, या पत्रकारांना खरंच एकदा त्यांची औकाद दाखवाच. कशाला हव्यात ओ यांना फुकटच्या उचापत्या ? अवैध धंदे करणारे समाजसुधारक समाजाचे शत्रू आहेत का सांगा बरं ? आता तर त्यातले बरेच जण आमदार-खासदार होतात. मंत्री-संत्री होतात. खरेतर आमदार-खासदार व्हायला, मंत्री व्हायला हेच तर मेरिट लागतं ना. इतकं महत्वाच मेरिट जर या समाजसुधारकांच्याकडे असेल तर पत्रकारांनी का बोंबलावं ? त्यांना समाजाचं भलं झालेलं बघवतच नाही बघा. वाल्मिक कराड सारखा दादा हवा ना प्रत्येक जिल्ह्याला. माणसानं अशी प्रगती करावी. गडी काय होता ? काय झाला ? कुठल्या कुठे गेला ना ? आणि पत्रकार पेपरात चार रेघोट्या खरडतात, हातात दांडकं धरून बोलतात म्हणजे लय शहाणे झाले का ? घर चालवता येत नाही आणि चालले वाल्मिक कराडवर बोलायला, कायदा व्यवस्थेवर बोलायला. खरंतर सगळ्या पोलिसांनी मिळून वाल्मिक कराडला गृहमंत्री करायची मागणी करावी. ते गृहमंत्री झाले तर ख-या अर्थाने राज्य प्रगतीपथावर जाईल. बाकी चोमडे पत्रकार काय कामाचे ओ ? नुसते खादीला कार आणि धरणीला भार. तेव्हा बिंधास काढा ठोकून. भाड्यांचे कराच एन्काऊटर. या चांगल्या उपक्रमाची सुरूवात आपल्या सांगली जिल्ह्यातून झाली तर मोदी साहेब आणि अमित शहासाहेब तुमचा गौरव करतील याची पक्की खात्री आहे.

लेबल:

१७.२.२५

जूनगावात शिवजयंतीची जय्यत तयारीजूनगावात शिवजयंतीची जय्यत तयारी

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क महाराष्ट्र

राजे श्री छत्रपती महाराज मंडळ जुनगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत ही जयंती साजरी करण्याचा विडा उचललेला आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जयंती सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
=======================
जाहीरात





लेबल:

१६.२.२५

अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण


मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी

अहेरी: डिजिटल इंडिया मोहिमेला गती देण्यासाठी नॅसकॉम फाउंडेशनतर्फे अत्याधुनिक साधनाचा व्यवहारिक वापर कसा करावा व नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. 

त्याअनुषंगाने नुकतेच १५ फेब्रुवारी रोजी अहेरी येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 उद्घाटन येथील गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणात मोबिलायझर, रोजगारसेवक आणि इतर सहभागींना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यात स्मार्टफोन, इंटरनेट, डिजिटल पेमेंट, शासकीय सेवांची ऑनलाइन उपलब्धता, सायबर सुरक्षा या विषयावर ट्रेनर शुभांगी रामगोनवार यांनी सविस्तरपणे माहिती दिली.

 अहेरी तालुक्यात पहिल्यांदाच नॅसकॉम फाउंडेशनतर्फे डिजिटल तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. हा उपक्रम डिजिटल साक्षरता आणि जनजागृती प्रशिक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

लेबल:

१३.२.२५

नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ? 🌑सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन 🌍आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे

नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ?


🌑सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन

🌍आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे 

✍️मुल: तालुका प्रतिनिधी ...
 ===================
जाहीरात


माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली 
===================
उन्हाळ्याची चाहूल लागली की जिकडे तिकडे पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू होते. आणि का होऊ नये? पाणी हे जीवन आहे, जीवन आहे तरच मानव आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन सरकारही प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुख सुविधांकडे लक्ष देत असते. म्हणूनच की काय! सरकारला "सरकार मायबाप" असे संबोधल्या जाते.
आणि माय बापानेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असते. अर्थात जनता ही सरकारवर अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्या गरजा पूर्ण करता आल्या नाही तर त्या कुटुंबाप्रमुखाकडे कुटुंबातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच बनतो. तशीच काहीशी परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात बघावयास मिळत आहे. 
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक ग्रामपंचायतींनी वीज देयके थकविल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी नळ योजना, पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत.

मुल तालुक्यातील नांदगाव, बेंबाळ गडेश्वरला, जुनासुरला व इतर आठ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेत या सर्व आठही गावांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उचलली. काही दिवस सुरळीत पिण्याचे पाणी मिळायला लागले. मात्र कालांतराने या योजनेला अखेरची घरघर लागली आणि ही योजना बंद चालू, बंद चालू राहू लागली. 
मागील काही महिन्यांपासून बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असल्यामुळे या योजनेत समाविष्ट असणाऱ्या आठही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीरपणे भेडसावत आहे. या बाबीची गंभीर दखल शासनाने घ्यावी, मात्र शासन आणि प्रशासन गंभीर नसल्याचे दिसताच नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप जी भोगावार यांनी पुढाकार घेऊन गावातील महिला व नागरिकांना सोबत घेऊन मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर तसेच या विभागाचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे मागण्यांचे निवेदन सोपविले आहे. येणाऱ्या 15 दिवसाच्या आत सदर योजना कार्यान्वित करून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आलेला आहे.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शिष्ट मंडळाला तात्काळ समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.आता प्रशासन या पाणी प्रश्नावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदन तंटामुक्ती अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जी भोगावार यांच्या नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच विजय जाधव, नीलकंठ जी नरसपुरे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर जी पवार, व महिला आणि पुरुष उपस्थित होते.

https://www.facebook.com/share/v/1Bw5aQe9AC/

https://youtu.be/Qi6kIBKEd2Q?si=tpZuJdTNdqY7Tj0I


लेबल:

११.२.२५

अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


✍️संतोष गोंगले,तालुका प्रतिनिधी

.✍️दरारा 24 तास न्यूज नेटवर्क...
मूल: प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून रेती तस्करांनी तालुक्यात अनेक ठिकाणी रेतीचा साठा करुन ठेवला आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचान्यांना रेती साठ्याबदल माहिती असताना कारवाई न करता याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे.


तालुक्यातील जानाळा प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ मध्ये बंधारा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने आवश्यकतेपेक्षा अधिक २५ ते ३० ब्रास अवैधरित्या रेतीचा साठा करून ठेवला आहे. यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्याऐवजी बध्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ ला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफरझोन क्षेत्र आहे. यामुळे येथे वन्यप्राण्यांचा वावर असल्याने मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना जंगलात जाण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. परंतु, संबंधित कंत्राटदाराने मात्र वन्यप्राण्यांच्या जिवाशी खेळून रात्रीच्या सुमारास जवळपास २५ ते ३० ब्रास अवैध रेती साठा केल्याचे दिसून येत आहे. तरीसुद्धा वनविभागाचे अधिकारी अवैध रेती साठ्यावर कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

तसेच अशाच प्रकारचे रेतीचे अवैध साठे तालुक्यातील अनेक भागात रेतीतस्करांनी केले आहे. यासंदर्भात तालुक्यातील महसूल, पोलीस आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना माहिती असताना कारवाई केल्या जात नाही, हा मात्र संशोधनाचा विषय आहे. दरम्यान, उघकीस आलेल्या जानाळा लगतच्या अवैध रेती साठ्याकडे लक्ष देवून संबंधित कंत्राटदार आणि कंत्राटदारास अभय देत असलेल्या संबंधित वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

संबंधित कंत्राटदार एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने कारवाई न करण्यासाठी एका मोठ्या नेत्याचा वनअधिकाऱ्यावर दवाव असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

लेबल:

१०.२.२५

आत्मविश्वास वाढविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाच्या : प्रा. चिन्ना चालूरकर

आत्मविश्वास वाढविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाच्या : प्रा. चिन्ना चालूरकर


🌆दरारा 24 तास न्युज नेटवर्क

✍️मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी... 

अहेरी : खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बरीच मोठी उर्जा मिळते. जिद्द, चिकाटी, संयम, अंगात असलेल्या सुप्तकला गुणांची उधळण करता येते. क्रीकेटसारख्या मैदानी खेळातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यास बरीच मदत होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सांघिक खेळाकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन मराठी विभाग प्रमुख प्रा. चिन्ना चालूरकर यांनी केले.
येथील राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालयात ४ फेब्रुवारीला शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे, प्रा. डॉ. सुरेश डोहाने, प्रा. डॉ. संतोष डाखरे, प्रा. डॉ. कैलास निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत महाविद्यालयातील विविध संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. लाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन संतोष उसेंडी यांनी तर आभार किरण कुरुसामी यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुनील ताजने यांनी सहकार्य केले.

लेबल:

नांदगाव सह आठ गावांचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद! सरपंच व ग्रामपंचायत कमिटी निष्क्रिय असल्याचा माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचा आरोप

नांदगाव सह आठ गावांचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद! 


सरपंच व ग्रामपंचायत कमिटी निष्क्रिय असल्याचा माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचा आरोप

✍️दरारा 24 तास न्यूज नेटवर्क...

चंद्रपूर : बेंबाळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे शुद्ध पाणी आठ गावांतील जनतेला वरदान ठरले होते. परंतु निष्क्रिय ग्रामपंचायतींनी वीज देयके थकविल्याने दोन महिन्यांपासून योजनेचा वीज पुरवठा महावितरणाने खंडित केला आहे. परिणामी नागरिकांना गावातील विहीर-बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
नांदगाव हे गाव या योजनेतील मोठे गाव आहे. या गावात राजकीय पुढारी वास्तव्याने असतात. मात्र या गावच्या समस्यांकडे पुढार्‍यांचे दुर्लक्ष झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे.
नांदगाव
ग्रामपंचायतीचे वसुली अभियान थकबाकी जमा झाली असताना सुद्धा विजेचे बिल का भरल्या जात नाही असा प्रश्न माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे. येथील ग्रामपंचायत नागरिकांना सुख सोयी, सुविधा देण्यात असमर्थ ठरली आहे. येथील सरपंच निष्क्रिय असल्याचा आरोप माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे.


बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अनेक महिन्यापासून बंद असल्याने अशुद्ध पाणी पिऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र प्रशासन नागरिकांना शुद्ध पाणी पाजण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे.

नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करणे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कर्तव्य आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून प्रादेशिक पाणी पुरवठा खंडित असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. 

बेंबाळ प्रादेशिक योजनेच्या पाण्यावर विसंबून असलेल्या परिसरातील नांदगाव, गोवर्धन, घोसरी, नवेगाव भुज, कोरंबी, चेक दुगाळा, बाबराळा, जुनासुर्ला येथील नागरिकांना अन्य स्रोतातील विहीर-बोअरवेलच्या अशुद्ध पाण्यावर तहान भागविण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

सद्यःस्थितीत उन्हाची दाहकता वाढत असून भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधीसुद्धा शुद्ध पाण्याच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. कधी नव्हे ते पाणी समस्या पेटली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.


जलजीवन मिशन की जला विना मरण मिशन?

हर घर पाणी या उदात्त हेतूने जलजीवन मिशनच्या कामाला मंजुरी मिळाल्याने संबंधित कंत्राटदार दोन वर्षांपूर्वी गावातील सिमेंट रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून रस्ते विद्रूप केलेले आहेत. परंतु टाकीचे बांधकाम पूर्णत्वास आलेले नाही. मात्र, घोसरी ग्रामपंचायतअंतर्गत लालहेटी, बोंडाळा खुर्द व अन्य गावातील सिमेंट रस्त्याने मार्गक्रमण करणे जिकिरीचे झालेले आहे. जलजीवन मिशनमुळे गावातील पाणी समस्या मिटेल, अशी भाबडी आस होती. परंतु काम रखडलेले आहेत. तरीसुद्धा कंत्राटदार व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. एकंदरीत या मिशनने समस्याच उभ्या केल्या आहेत. या समस्यांना मार्ग मोकळा करून समस्या विरहित गाव निर्माण करणे गरजेचे आहे.
बेंबाळ येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पूरक नळ पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये मंजूर झाली होती हे विशेष.

लेबल:

रुग्णांना फळ, बिस्कीट वाटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा

रुग्णांना फळ, बिस्कीट वाटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 

पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे पूर्व विदर्भ संघटक किरण भाऊ पांडव,विधानपरिषद आमदार,डॉ मनिषाताई कायंदे,यांच्या सूचनेनुसार पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्रजी भोंडेकर,जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी राय,शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते,उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला,यांच्या मार्गदर्शनात,विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर,शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. 


 यावेळी पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ,बिस्कीट वाटप करण्यात आले,तर प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरे येथील रुग्णांना सुध्दा फळ,बिस्कीट पुडे वाटप करून दि. 9 फेब्रुवारी रविवारला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संतोष पार्लेवर,समनवयक व्यंकटेश चिप्पावार,भय्याजी बुरांडे,वेदप्रकाश आगरकर,सचिन भसारकर,अविचल जाधव, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लेबल:

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेची मुसंडी! जिल्हाप्रमुखांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा व आढावा बैठका ...

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेची मुसंडी!


जिल्हाप्रमुखांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा व आढावा बैठका ...

मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी,

अहेरी: विधानसभा निवडणुकीत भरघोश यश मिळाल्यानंतर विजयाच्या आनंदाने उत्स्फूर्त होऊन गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट मजबुतीने पाय रोवत आहे.

शिवसेनेचे नेते तथा पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व गावात शिवसेनेची शाखा निर्माण करण्याचा चंग शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी बेलसरे यांनी बांधलेला आहे. 

माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली

त्यानुसार त्यांनी तालुक्या- तालुक्यांचा दौरा सुरू केला असून पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. सर्व स्तरावर कार्यकारणी गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्हाप्रमुख स्वतः हिरहिरीने  जिल्ह्यात झंझावाती दौरे करत आहेत व जनसंपर्क वाढवलेला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना शिंदे गट गडचिरोली जिल्ह्यात आपले पाय मजबूत केलेले दिसेल यात शंका उपस्थित व्हायला नको!

लेबल:

९.२.२५

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी व अल्लापल्ली येथे टिफन बॉक्स वितरित

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी व अल्लापल्ली येथे टीफन बॉक्स वितरित



✍️मनोज गेडाम अहेरी तालुका प्रतिनिधी...


अहेरी: महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात तालुकाप्रमुख अक्षय करपे यांच्या पुढाकाराने आलापल्ली व अहेरी येथे ऑटो रिक्षा चालकांना टिफिन बॉक्स वितरित करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख अक्षय करपे, अहेरी विभाग कामगार सेनेचे प्रकाश गद्दलवार, युवा सेना तालुका प्रमुख प्रीतम पेटेवार, अल्लापल्ली शहर प्रमुख मयूर त्रिनगरीवार,व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

लेबल:

८.२.२५

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार माननीय एकनाथ भाई शिंदे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार माननीय एकनाथ भाई शिंदे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा...

शुभेच्छुक:-माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली
=======================

शुभेच्छुक:-माननीय मनोज भाऊ गेडाम तालुकाप्रमुख अहेरी जिल्हा गडचिरोली 
=======================

लेबल:

७.२.२५

दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे

दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे


दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीचे सुरुवातीचे ट्रेंड समोर आले आहेत.

सध्या आप 5 जागांवर तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे.

सुलतानपूर, बाबरपूर, बुरारी, त्रिनगर आणि देवळीमध्ये आप आघाडीवर आहे, तर आरकेपुरम, पटपरगंज आणि रोहिणीमध्ये भाजप आघाडीवर आहे.

लेबल:

दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे

दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे


दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीचे सुरुवातीचे ट्रेंड समोर आले आहेत.

सध्या आप 5 जागांवर तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे.

सुलतानपूर, बाबरपूर, बुरारी, त्रिनगर आणि देवळीमध्ये आप आघाडीवर आहे, तर आरकेपुरम, पटपरगंज आणि रोहिणीमध्ये भाजप आघाडीवर आहे.

लेबल:

६.२.२५

शिवसेना जिल्हाप्रमुख व सह जिल्हा प्रमुख यांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा । गावागावात शाखा निर्माण करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश

शिवसेना जिल्हाप्रमुख व सह जिल्हा प्रमुख यांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा


। गावागावात शाखा निर्माण करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश

✍️मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी

अहेरी: शिवसेना (शिंदे गट) गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राकेशजी बेलसरे, सह जिल्हाप्रमुख हेमंत जी जम्बेवार व युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक दादा भारसाकडे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे सर्व तालुके पिंजून काढण्याचे ठरविले असून तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा गठित करण्याचे आदेश प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 


दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय विश्राम भवन येथे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना जिल्हा सह प्रमुख हेमंत जी जम्मेवार यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. 


मार्गदर्शनात पुढे म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्यात करिता गावागावात शाखा निर्माण करा. तसेच शहरामध्ये प्रभाग रचनेनुसार शाखाप्रमुख, बौद्ध प्रमुख नियुक्त करा आणि शहरांमध्ये प्रभाग रचनेनुसार शाखा निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.


जिल्हाप्रमुख राकेश जी बेलसरे यांनी सुद्धा शासन काळातील योजना लोकांना पटवून देऊन पक्ष वाढीचे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. 


या बैठकीला आरमोरी विधानसभा संघटक नारायणजी धक्काते, विधानसभा प्रमुख संतोष गोंदोडे, विधानसभा समन्वयक मधुसूदन चौधरी, राकेश जी बैस विधानसभा समन्वयक, राजेंद्रजी दिवटे तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख संजय चट्टे, शैलेंद्र कोहळे विधानसभा सह संघटक,


 सौ अर्चनाताई संतोष गोंदोडे विधानसभा महिला प्रमुख, प्राध्यापक सौरव कांबळे युवा नेते, सौ वैशाली बिजागरे महिला शहर प्रमुख, सौ किरण ताई बर्डे शिवसेना महिला तालुकाप्रमुख वडसा, सौरत्नाताई मेश्राम, आशाताई खोब्रागडे, सिंधुताई जंगम, धनंजय गहेरवार, अश्विन जी तितरमारे, अमरसिंग गहेरवार, विवेक खापरे, आणि तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लेबल: