पुल तुटल्यामुळे मोठा अपघात, ६०० लोक पाण्याखाली

गुजरातमधील मोरबी शहरातील मच्छू नदीवरील जवळपास शतक जुना असलेला झुलता पूल रविवारी संध्याकाळी कोसळला. या अपघातात ६० लोकांचा मृत्यू झाला. हा पूल लाकडाचा आहे, म्हणून त्याला लकडा पूल असेही म्हणतात. पाच दिवसांपूर्वी हा पूल दुरुस्तीनंतर पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला. त्यावर उभ्या असलेल्या लोकांचा भार सहन न झाल्याने हा पूल तुटल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूल कसा हलला, कसा लटकला आणि नंतर नदीत कसा कोसळला हे घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. लोक आरडाओरडा करत जीव वाचवण्यासाठी नदीतून बाहेर येऊ लागले. अनेकांनी पुलाचा काही भाग पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शी अमित पटेल आणि सुक्रम यांनी सांगितले की, दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार व रविवार असल्याने अनेक लोक येथे आले होते. हे पर्यटकांचे एक आवडते ठिकाण आहे. पुलावर प्रचंड गर्दी असल्याने हा अपघात झाला असावा. जेव्हा हा पूल कोसळला तेव्हा लोक एकमेकांवर पडले. प्रत्येकाला फक्त आपला जीव वाचवायचा होता एका तरुणाने सांगितले की, तोही पुलाला भेट देण्यासाठी आला होता. तो पुलाच्या मधोमध जात होता. मात्र पुलावर चढण्यापूर्वीच ह...