पोस्ट्स

जळगाव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आपला विकास आणि गांव भकास!

इमेज
आपला विकास आणि गांव भकास! शिवराम पाटील ९२७०९६३१२२ महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव   बीज,खते,औषधी आणि माल विक्री यात शेतकरीची दैना होत आहे.शेतकऱ्यांची मुले सरकारी नोकरीत लागलीत कि,ते बापालाही सोडत नाहीत.तर इतरांची कशी कदर करणार?    याला कारण आहे.मी अनेकदा विस्तृत लिहीले आहे कि, शेतकरी वर्गात, ग्रामीण भागात बुद्धी, ज्ञान,निती ची अलर्जी आहे.कोणी माणूस डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर बनला तर त्याचा सत्कार होत नाही.पण पोलिस , फौजदार, तहसीलदार,बीडीओ बनला तर सत्कार करतात.का?याला आता शेतकऱ्यांना लुटण्याचा सरकारी परवाना मिळाला आहे.डॉक्टर, वकिल इंजिनिअर प्रोफेसर ला तसा परवाना मिळत नाही.त्याला बुद्धी ज्ञान वापरून व्यवसाय करावा लागतो.    शिवाय गावात जो माणूस लुटमार करतो,दारू मटण खाऊ घालतो लोक त्याला नेता म्हणतात.सरपंच निवडून देतात.म्हणे जो लुटतो तोच खाऊ पिऊ घालतो.जो लुटत नाही,दारू दरफडा करीत नाही तो काय कामाचा?असा खुलासा देतात.     घर, जमीन,खळे साठी भाऊ भाऊ, शेजारी शेजारी वाद घालून पोलिस स्टेशनमध्ये येतात.एकमेकांच्या शेतीवर अतिक्रमण करतात.या वेळेस गीता,भागवत, रामायण,...

कृषी केंद्रातून जादा दराने कापूस बियाणे विक्री करताना रंगेहात पकडले

इमेज
जळगाव - खरीप हंगामाची सुरुवात झालेली  असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी करण्यात येत आहे. यामध्ये राशी कापसाचे 659 या वाणाची मागणी होत आहे. मागणी जास्त असल्याचा फायदा घेत या बियाण्याचे पाकीट बाजारात बाराशे रुपयांच्या जादा दराने विकले जात आहे. आज (दि. 24) रोजी म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक पाठवून विक्रेत्याला ज्यादा दराने बियाण्याची विक्री करताना रंगेहाथ पकडत कारवाई केली आहे. आज दि. 24 रोजी जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर तत्काळ सापळा रचण्याचे ठरवले. पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट 1200 रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा, विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाई कामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. या कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, धीरज बडे, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक सदर सापळा पथकात सहभागी होते.

लाचखोर महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

इमेज
*लाचखोर महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात* जळगाव:- जिल्ह्यातून लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आलीय. गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी २५ हजार रुपयाची मागणी केल्याप्रकरणी शिवरेदिगर (ता. पारोळा) येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी ताब्यात घेतले आहे. पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे दिगर येथील रहिवाशी तक्रारदाराचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. वीट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असते. यामुळे मातीची वाहतूक करण्याकरता त्यांनी तलाठी वर्षा काकूस्ते यांची भेट घेऊन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरता तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये जमा करून घेतले. त्यानंतर तक्रारदाराने गौण खनिज परवानाची चौकशी करण्यासाठी तलाठी वर्षा काकुस्ते यांची १२ डिसेंबर २०२३ ला भेट घेतली. यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी दिलेल्या पैशाची पावती न देता त्या व्यतिरिक्त २५ हजाराची मागणी केली होती. दरम्यान सदर तक्रारीची १३ डिसेंबरला पडताळणी केली. पडताळणी दरम्यान तलाठी वर्षा काकुस्ते यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याच दिवशी पुन्हा पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रु...

पोलीस पथकावर काळाचा घाला पोलीस निरीक्षकासह दोघांचा मृत्यू

इमेज
पोलीस पथकावर काळाचा घाला पोलीस निरीक्षकासह दोघांचा मृत्यू जळगाव : जळगावतून एक मोठी बातमी समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहायक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. संबंधित घटनेमुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही जळगावच्या अंजनी धरणाजवळ घडली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचं हे पथक जळगावहुन एरंडोल-कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी होतं. पण रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या चालत्या गाडीवर झाड कोसळलं. या घटनेमुळे स्थानिक नागरीकदेखील सुन्न झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री पावणे 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झालाय. तर इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची घटना समोर आल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडल...

जळगावात दोन डोकी असलेल्या बाळाचा जन्म

इमेज
आई होण्याची चाहूल हा प्रत्येक महिलेसाठी अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण असतो. आपलं बाळ सुखरुप असावं असचं प्रत्येक आईला वाटत असते. जळगाव मध्ये एका महिलेने एकाचवेळी तीन मुलींना जन्म दिला. मात्र, या बाळांच्या जन्मानंतर ही माता एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकली. एकीसाठी आंनदी व्हावे की दोघींसाठी दु:खी असा प्रश्न या महिलेला पडला. कारण एक बाळ सुखरुप असले तरी दोन बाळ जुळी होती. या मुलींना दोन वेगवेगळी डोकी आणि एकच धड आहे. जळगावच्या एका खासगी रुग्णालयात या महिलेची प्रसुती झाली. या महिलेने तीन मुलींना जन्म दिला. त्यात दोन मुली या ''जुळलेल्या जुळ्या असून दोघींना एक हृदय, शरीर आणि दोन हात व पाय आहेत. एकाच हृदयावर आयुष्याचा श्वास जिवंत असल्याने दोघींना ऑक्सिजनवर ठेवले आहे. तर, तिसऱ्या मुलीची तब्येत उत्तम आहे. जळगाव जिल्ह्यात अशी प्रकारची पहिलीच घटना घडली असल्याची माहिती डॉ. वैभव महाजन यांनी दिली आहे. जळगावचे माहेर असलेल्या विवाहितेची काही महिन्यांपूर्वी गर्भधारणा राहिली झाली होती. त्यानंतर तपासणी केली त्या वेळी तिच्या गर्भात तीन बाळ असल्याचे दिसून आले. त्यातील दोघींना एकच धड असून मानेपासून दोघांच...