पोस्ट्स

मूल चे पत्रकार आणि जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे, *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित होणार

इमेज
*मूल चे पत्रकार आणि जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे, *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित होणार!* पुणे, मूल, प्रतिनिधी.... *जागृत ग्राहक राजा* या सामाजिक ग्राहक संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या  समारोप समारंभात, दिनांक २३फेब्रुवारी २०२५रोजी पुणे येथे ग्राहक चळवळीतील ५ आघाडीच्या कार्यकर्त्यांना  *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यात  १.दीपक देशपांडे,ता मूल, जि.चंद्रपूर २.शिवाजी काळे, ता.जुन्नर  ३.सौ दुर्गाताई शुक्रे,पुणे  ४.सौ श्रद्धा शिंदे, इस्लामपूर तसेच  राज्य कार्यकरिणी विशेष सन्मान - सौ शैला शिळीमकर, पुणे  आणि, यावेळी निबंध लेखन उपक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांचा बक्षीस वितरण व  यथोचित  सन्मान करण्यात येईल  सरकारी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रतिनिधी  पुणे,सातारा व सांगली   यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

एस पी साहेब चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर करता का ? साले खुपच माजलेत ओ !

एस पी साहेब चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर करता का ? साले खुपच माजलेत ओ ! दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, 9561551006 सध्या सांगली जिल्ह्यात कायदा-व्यवस्थेचा प्रश्न बिकट होत चाललाय. सगळे अवैध धंदे तेजीत आहेत. खासगी सावकारी, गुटखा, मटका, वाळूचोरी, सेक्स रॅकेट, खून, मारामा-या, ड्रग्ज विक्री, गावठी दारू, बनावट दारू विक्री सगळं सगळं खुलेआम सुरू आहे. सगळं बिनबोभाट सुरू आहे. अवैध धंदे करणारे हे सगळे समाजसुधारक सध्या तेजीत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात त्यांचा यथोचित मानसन्मान होतो. त्यांना प्राधान्याने सेवा मिळते. त्यांची योग्य पध्दतीने बडदास्त ठेवली जाते. सगळं कसं सुरूळीत आहे. पण खरी अडचण आहे ती पत्रकारांची. पत्रकार साले माजलेत. काहीही गरज नसताना अवैध धंद्यांची बातमी लावतात. ड्रग्ज पकडल्याची, विक्रीची बातमी लावतात. गांजा विक्रीची बातमी लावतात. सगळं सुरळीत असताना पत्रकार या बातम्या लावून सामाजिक वातावरण कुलूषित करत आहेत. अवैध धंदे करणारे समाजसुधारक आणि पोलिस यांच्यातला सलोखा गरज नसताना बिघडवत आहेत. समाजात जर शांतता हवी असेल तर या दोघांच्यात सलोखा असायलाच हवा ना ? कुठे हाफ मर्डर झाला, कुठे ...

जूनगावात शिवजयंतीची जय्यत तयारीजूनगावात शिवजयंतीची जय्यत तयारी

इमेज
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राजे श्री छत्रपती महाराज मंडळ जुनगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत ही जयंती साजरी करण्याचा विडा उचललेला आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जयंती सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. ======================= जाहीरात

अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

इमेज
अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी अहेरी: डिजिटल इंडिया मोहिमेला गती देण्यासाठी नॅसकॉम फाउंडेशनतर्फे अत्याधुनिक साधनाचा व्यवहारिक वापर कसा करावा व नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे.  त्याअनुषंगाने नुकतेच १५ फेब्रुवारी रोजी अहेरी येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  उद्घाटन येथील गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणात मोबिलायझर, रोजगारसेवक आणि इतर सहभागींना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यात स्मार्टफोन, इंटरनेट, डिजिटल पेमेंट, शासकीय सेवांची ऑनलाइन उपलब्धता, सायबर सुरक्षा या विषयावर ट्रेनर शुभांगी रामगोनवार यांनी सविस्तरपणे माहिती दिली.  अहेरी तालुक्यात पहिल्यांदाच नॅसकॉम फाउंडेशनतर्फे डिजिटल तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. हा उपक्रम डिजिटल साक्षरता आणि जनजागृती प्रशिक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ? 🌑सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन 🌍आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे

इमेज
नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ? 🌑 सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन 🌍 आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे  ✍️मुल: तालुका प्रतिनिधी ...  =================== जाहीरात माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली  =================== उन्हाळ्याची चाहूल लागली की जिकडे तिकडे पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू होते. आणि का होऊ नये? पाणी हे जीवन आहे, जीवन आहे तरच मानव आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन सरकारही प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुख सुविधांकडे लक्ष देत असते. म्हणूनच की काय! सरकारला "सरकार मायबाप" असे संबोधल्या जाते. आणि माय बापानेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असते. अर्थात जनता ही सरकारवर अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्या गरजा पूर्ण करता आल्या नाही तर त्या कुटुंबाप्रमुखाकडे कुटुंबातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच बनतो. तशीच काहीशी परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात बघावयास मिळत आहे.  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अन...

अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

इमेज
अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ✍️संतोष गोंगले,तालुका प्रतिनिधी .✍️दरारा 24 तास न्यूज नेटवर्क... मूल: प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून रेती तस्करांनी तालुक्यात अनेक ठिकाणी रेतीचा साठा करुन ठेवला आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचान्यांना रेती साठ्याबदल माहिती असताना कारवाई न करता याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. तालुक्यातील जानाळा प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ मध्ये बंधारा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने आवश्यकतेपेक्षा अधिक २५ ते ३० ब्रास अवैधरित्या रेतीचा साठा करून ठेवला आहे. यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्याऐवजी बध्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ ला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफरझोन क्षेत्र आहे. यामुळे येथे वन्यप्राण्यांचा वावर असल्याने मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना जंगलात जाण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. परंतु, संबंधित कंत्राटदाराने मात्र वन्यप्राण्यांच्या जिवाशी खेळून रात्रीच्या सुमारास जवळपास २५ ते ३० ब्रास अ...

आत्मविश्वास वाढविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाच्या : प्रा. चिन्ना चालूरकर

इमेज
आत्मविश्वास वाढविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाच्या : प्रा. चिन्ना चालूरकर 🌆दरारा 24 तास न्युज नेटवर्क ✍️मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी...  अहेरी : खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बरीच मोठी उर्जा मिळते. जिद्द, चिकाटी, संयम, अंगात असलेल्या सुप्तकला गुणांची उधळण करता येते. क्रीकेटसारख्या मैदानी खेळातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यास बरीच मदत होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सांघिक खेळाकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन मराठी विभाग प्रमुख प्रा. चिन्ना चालूरकर यांनी केले. येथील राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालयात ४ फेब्रुवारीला शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे, प्रा. डॉ. सुरेश डोहाने, प्रा. डॉ. संतोष डाखरे, प्रा. डॉ. कैलास निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत महाविद्यालयातील विविध संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आल...