गोसेखुर्द प्रकल्पातून सिंचनासाठी असोला मेंढा तलावात पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
चंद्रपूर: विशेष प्रतिनिधी
खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे मुल व पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्यामुळे त्यांच्या जमिनीची मशागत करून उदरनिर्वाह करण्याची क्षमता धोक्यात आली आहे. खरीप हंगामात पाऊस कमी झाल्यामुळे, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या भागात भाताची शेती मोठ्या प्रमाणात होत असून दुर्दैवाने या हंगामात पाऊस कमी झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी कालव्यांद्वारे असोलामेंढा तलावात सोडण्याची मागणी केली आहे. गोसेखुर्द प्रकल्प हा या भागातील सिंचनासाठी पाण्याचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. शेतकरी त्यांच्या पिकांचे पालनपोषण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या पाणीपुरवठ्यावर खूप अवलंबून असतात. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पातून आसोलामेंढा तलावापर्यंत पुरेसे पाणी सोडून कालव्याद्वारे पाणी पुरवठा केल्यास मुल व पोंभुर्णा तालूक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अशा आशयाचे निवेदन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना विनोद अहिरकर यांनी दिले. खासदार महोदयांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पत्र लिहून सदर मागणी पूर्ण करावी असे पत्र दिले आहे.
गोसेखुर्द प्रकल्पातून सिंचनासाठी आसोलामेंढा तलावात पाणी सोडून मुल व पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे पत्रात म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading