वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा-भाजयू मोचे तालुकाध्यक्ष राहुल भाऊ पाल


तथा उपसरपंच जुनगाव
राहुल भाऊ पाल,

 

पोंभुर्णा: तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दत्तक गाव म्हणून घेतलेल्या जुनगावात विजेची समस्या नेहमीच उद्भवत असते. या बाबीकडे महावितरणने लक्ष केंद्रित करून ताबडतोब वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि आज सकाळपासून खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी जूनगावचे उपसरपंच तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ पाल यांनी केली आहे.
    आज सकाळपासूनच अवकाळी पावसाने व विजेच्या कडकडाटाने परिसर दणाणून सोडला.याच दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून अद्याप पावतो सुरळीत झालेला नाही. त्यामुळे अनेकांची विजेवर चालणारी कामे खोळंबली आहेत. नांदगाव, जूनगाव, देवाडा बुज. घोसरी इत्यादी गावचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू