[मुल तालुका प्रतिनिधी] – मरेगाव ते राजोली या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी बनविण्यात आलेले स्पीड ब्रेकर हे वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या ब्रेकरांची उंची अत्यधिक असल्यामुळे दोनचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार उड्या घ्याव्या लागत आहेत, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी अशी मागणी केली आहे की, या स्पीड ब्रेकरांचे डिझाईन मूलसारख्या (रॅम्प पद्धतीने) पसरट प्रकारात असावे, जेणेकरून वाहनांना झटका न बसता सुलभतेने त्यावरून जाता येईल.
वाहनचालकांचा आरोप आहे की, हे ब्रेकर कोणत्याही ठराविक मापदंडानुसार न बांधता, केवळ ठिकठिकाणी माती आणि डांबरीचे ढिगारे टाकून तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळेस या ब्रेकरची उंची अंदाजात न आल्याने अनेकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांची मागणी:
1. सर्व ब्रेकरांची उंची कमी करावी.
2. ब्रेकरांची रुंदी वाढवून ते रॅम्प प्रकारात तयार करावेत.
3. प्रत्येक ब्रेकरवर पांढऱ्या रंगाचे झेब्रा पट्टे काढावेत, जेणेकरून रात्रीच्या वेळेस ते लक्षात येतील.
4. ब्रेकरांच्या ठिकाणी सूचना फलक लावावेत.
तत्काल उपाययोजना न झाल्यास स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून आवश्यक ती सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading