Advertisement

📲 नेटवर्कचा घसरलेला दर्जा : ग्रामीण भागातील मोबाईल वापरकर्ते हैराण 🗓️ जूनगाव, देवाडा, पिपरी देशपांडे, गंगापूर, टोक, चेकठाणा परिसरातील जनता प्रचंड त्रस्त

 


📲 नेटवर्कचा घसरलेला दर्जा : ग्रामीण भागातील मोबाईल वापरकर्ते हैराण

🗓️ जूनगाव, देवाडा, पिपरी देशपांडे, गंगापूर, टोक, चेकठाणा परिसरातील जनता प्रचंड त्रस्त

📱 मोबाईल आहे, डेटा प्लॅन आहे, पण नेटवर्क नाही!

ग्रामीण भागातील मोबाईल धारकांची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. जूनगाव, देवाडा, पिपरी देशपांडे, गंगापूर, टोक, चेकठाणा आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क अपयशी ठरत आहे. इंटरनेट डेटा अक्षरशः वाया जातोय, आणि नागरिकांच्या संयमाचा बांध फुटताना दिसतोय.

📉 सर्व्हिस आहे पण सेवा नाही!

सुरुवातीला आयडिया (Vi) या कंपनीवर ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास होता. अनेकांनी ही सेवा घेतली. मात्र, सततच्या नेटवर्क डॉउन आणि अंथरुणावर पडूनही सिग्नल शोधावा लागणाऱ्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आयडियाचा त्याग केला.

त्यानंतर ‘जिओ’ ही कंपनी ग्रामीण भागात आशेचा किरण ठरावी असे वाटले. मोफत प्लॅन आणि ब्रॉड नेटवर्कच्या जाहिरातींनी ग्राहकांना आकर्षित केले. पण प्रत्यक्षात, "केवळ फोन रिसिव्ह करण्यापुरतंच" नेटवर्क उरलं आहे, असं चित्र आहे. इंटरनेट स्पीड शून्याजवळ आणि व्हिडीओ कॉल तर दूरच! जिओचा वापर केवळ इनकमिंग कॉलपुरता उरतो आहे, अशी टीका होऊ लागली आहे.

🧾 बीएसएनएलची ब्राह्मक स्वप्नं

एकीकडे खाजगी कंपन्यांनी निराशा दिली, तर दुसरीकडे सरकारच्या बीएसएनएलने स्वस्त प्लॅन्सच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिरकाव केला. मात्र, जाहिरातीत दाखवलेले स्वप्न आणि प्रत्यक्ष सेवा यामध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे. स्पीड हा शब्द जणू बीएसएनएलच्या सेवेतच नाही. नेटवर्क येणं म्हणजे सुदैवाची बाब!

😡 ग्राहकांचा संताप उसळला

ग्रामस्थांच्या मते, "रिचार्ज केल्यावर डाटा कापला जातो, पण वापरायचं काहीच मिळत नाही." मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स असूनही नेटवर्क बिघडलेलं आहे. हजारो ग्राहकांना याचा आर्थिक आणि मानसिक फटका बसत आहे. ऑनलाइन शिक्षण, डिजिटल व्यवहार, बँकिंग सेवा, आरोग्य सल्ला — सगळंच ठप्प!

तक्रार करायची कुठे?

ग्रामीण भागातील नागरिकांसमोर मोठा प्रश्न आहे – या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी कोण घेणार? टोल फ्री क्रमांकांवर तक्रार करून काहीही उपयोग होत नसल्याची भावना वाढतेय.


📢 "दरारा 24 तास न्यूज नेटवर्क"कडून मागणी :

➡️ टेलिकॉम कंपन्यांनी ग्रामीण भागात तातडीने दखल घ्यावी.
➡️ टॉवरची क्षमता वाढवावी, तांत्रिक दुरुस्त्या कराव्यात.
➡️ ग्राहकांच्या तक्रारींसाठी वेगळा, प्रभावी मंच तयार करावा.


तुम्हीही या समस्येने त्रस्त आहात का? खाली कमेंटमध्ये आपला अनुभव जरूर शेअर करा.

✍️ – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📍 जूनगाव प्रतिनिधी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या