Advertisement

वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर – नागरिकांना सतर्कतेचा इशारा!





दरारा २४ तास न्यूज नेटवर्क ● चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीचा जलप्रवाह वेगाने वाढला आहे. नदीतील पाणी आता धोक्याच्या पातळीवर पोहोचले असून, काही ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर, चंद्रपूर शहर परिसरात वैनगंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. नद्या, नाले, ओढ्यांचे पाणी भरकटत असल्याने नागरिकांनी प्रवाहात उतरणे धोकादायक ठरू शकते. अनेक ठिकाणी नाल्यांना पूर येऊन शाळा, शेती आणि संपर्क मार्गांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रशासनाची सूचना:

  • कोणताही नागरिक नदी, नाले किंवा ओढ्यांमध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये.
  • पूरग्रस्त किंवा कमी उंचीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे.
  • गरज असल्यास प्रशासनाकडून स्थलांतराचे आदेश देण्यात येऊ शकतात.
  • स्थानिक प्रशासन, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभाग वेळोवेळी सूचनांचे पालन करावे.

स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथके, बोटींनी बचाव पथक आणि वैद्यकीय पथके तैनात केली असून, संभाव्य धोक्याच्या भागांची पाहणी सुरू आहे. शाळांमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मंत्रालय स्तरावरूनही सतर्कतेचे निर्देश दिले गेले असून, पूरजन्य परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.


नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

📍 अधिक माहिती व अपडेटसाठी जोडले राहा...
Vainganga News Live



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या