Advertisement

स्मशानभूमीतच दोन गटांमध्ये दबंग स्टाईल हाणामारी मृतदेह बाजूला ठेवून दे-दणादण मारामारी; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 



स्मशानभूमीतच दोन गटांमध्ये दबंग स्टाईल हाणामारी

मृतदेह बाजूला ठेवून दे-दणादण मारामारी; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट

✍️ सुखसागर एम. झाडे
गडचिरोली – अहेरी

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली गावालगत असलेल्या स्मशानभूमीतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंतिमसंस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांपुढे अतिक्रमण करणाऱ्या गटाने अडथळा निर्माण केल्याने वाद निर्माण झाला आणि काही वेळातच त्याचे रुपांतर प्रचंड हाणामारीत झाले.

मृतदेह बाजूलाच ठेवून झालेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.


घटना कशी घडली?

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, नागेपल्ली स्मशानभूमीत काही बाहेरगावचे लोक गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर वराहपालन (डुकरे पालन) सुरू करून बसले होते. याआधीही दोनदा ग्रामपंचायतीने कारवाई करून अतिक्रमण हटवले होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा त्याठिकाणी अतिक्रमण झाले.

रविवार रोजी गावातील एका व्यक्तीच्या अंतिमसंस्कारासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले असता, अतिक्रमणकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावरून झालेला वाद क्षणातच उग्र बनला. पाहता पाहता दोन्ही गटांनी लाठ्या-काठ्यांचा वापर करून दे-दणादण हाणामारी केली.


जखमी आणि गुन्हा दाखल

या हाणामारीत दोन्ही बाजूंतील काहीजण जखमी झाले असून ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.


पोलिसांची तातडीची कारवाई

घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांना वेगळे करून परिस्थिती आटोक्यात आणली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असून पुढील तपास सुरू आहे.


गावात भीतीचे सावट

स्मशानभूमीसारख्या पवित्र जागी दबंग स्टाईलमध्ये हाणामारी झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,

  • अतिक्रमण कायमचे हटवावे,
  • स्मशानभूमीची जागा सुरक्षित करावी,
  • आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर सध्या शांतता आहे; मात्र स्थायी तोडगा निघाल्याशिवाय अशा घटना पुन्हा घडू शकतात.


👉  दरारा 24 तास न्यूज नेटवर्क



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या